राज्य शासनाच्या “उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवा

राज्य शासनाच्या “उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४”  : प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख दि. ३१ जानेवारी

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दि. १ जानेवारी २०२४ ते दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख दि. ३१ जानेवारी २०२५ अशी आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई- ३२, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत.  अर्जाचं नमुने dgipr.maharashtra.gov.in  व  www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *